संबंधित माहिती
- पित्याला वेळप्रसंगी ‘न्हावी'ही व्हावे लागते : सचिन तेंडुलकर यांची आगळी वेगळी गोष्ट
- Lockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5 रेसिपी
- कोरोना आणि सेक्स : लॉकडाऊन मध्ये सिंगल आणि एकटे असाल तर ‘सेक्स बडी शोधा'
- चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल, नवीन मार्गदर्शकतत्व लागू
- लॉकडाऊनच्या काळात या सोप्या पद्धतीने स्वच्छ ठेवा आपल्या घरातील वस्तू
लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची माहिती
देशातील काही स्तरांमधून लॉकडाउनवर कितीही टीका होत असली, तरीदेखील लॉकडाउनने 14 ते 19 लाख नागरिकांना कोरोनाबाधित होण्यापासून वाचवले आहे. तसेच लॉकडाउनमुळे 37,000 ते 78,000 कोरोनाबाधित रुग्णांचे संभाव्य मृत्यूही टळले आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
नीती आोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतचे विश्लेषण दिले आहे. लॉकडाउन आणि विविध नियमांच्या अंलबजावणीमुळे कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार रोखला गेला, असे डॉ. पॉल यांचे म्हणणे आहे.
भारतात 3 एप्रिल रोजी 22.6 टक्के रुग्ण आढळत होते. मात्र, एप्रिल 4 नंतर हे प्रमाण कमी होत ते आता 5.5 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे, असे डॉ. पॉल म्हणाले. देशात 25 मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे रुग्णांची संख्या रोखण्यात यश आले असून हा बदल स्पष्टपणे दाखवण्यासाठी काही कालावधी जावा लागला, असे डॉ. पॉल म्हणाले.
लॉकडाउनमुळे देशातील मृत्यूचे प्रमाण घटण्याबरोबरच आरोग्याची साधने आणि आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्यासाठीही सरकारला अवधि मिळाला. त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत आणि कंटेनमेंट झोनमधील अनुभव तपासण्याचाही अवसर मिळू शकला. त्याचप्रमाणे आवश्यक ती औषधांचा पुरवठा आणि संशोधनासाठीही वेळ मिळाला असेही, डॉ. पॉल यांनी सांगितले.
नीती आोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतचे विश्लेषण दिले आहे. लॉकडाउन आणि विविध नियमांच्या अंलबजावणीमुळे कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार रोखला गेला, असे डॉ. पॉल यांचे म्हणणे आहे.
भारतात 3 एप्रिल रोजी 22.6 टक्के रुग्ण आढळत होते. मात्र, एप्रिल 4 नंतर हे प्रमाण कमी होत ते आता 5.5 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे, असे डॉ. पॉल म्हणाले. देशात 25 मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे रुग्णांची संख्या रोखण्यात यश आले असून हा बदल स्पष्टपणे दाखवण्यासाठी काही कालावधी जावा लागला, असे डॉ. पॉल म्हणाले.
